• Home
  • Breaking News
  • मुंबईतील सहा नामांकित हॉटेलवर FDA धाड, हॉटेलचे परवाने रद्द…
Image

मुंबईतील सहा नामांकित हॉटेलवर FDA धाड, हॉटेलचे परवाने रद्द…

आयुक्त तुकाराम मुंढे यांची नामांकित उद्योग समूहाच्या हॉटेलवर कारवाई…

एफडीएने २७ जून रोजी नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी त्या रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केला. हे रेस्टॉरंट आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (FDA)  IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवत आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींवर FDA ने काल धाड टाकत धडक कारवाई केली आहे. तिथे त्यांना अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले आणि प्रशासनाने लगेच या सगळ्या हॉटेल वर कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

कोणत्या कोणत्या हॉटेल्सवर झाली कारवाई?

त्यानंतर बोरीवली येथील एम. के. बेकरीवरही कारवाई करण्यात आली. येथे त्या बेकरीच्या जागेचे बांधकाम सुरू असतानाच इथे खाद्यपदार्थ बनवत असल्याचे आढळून आले. तसेच तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे प्रशासनाच्या नजरेस आले, त्यामुळे या बेकरीचा परवानाही निलंबित करण्यात आला. याशिवाय भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्र्यातील काही हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

बंटी-बबली फेक FDA अधिकारी सांगून हॉटेल मालकाला धमकावण्याचा प्रयत्न

दरम्यान, FDA अधिकारी असल्याचे सांगत बोरिवलीमधील आहार हॉटेलवर धाड टाकण्याची घटना समोर आली आहे. ‘बंटी’ आणि ‘बबली’ या नावांच्या दोन व्यक्तींनी स्वतःला FDA अधिकारी सांगत हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी हॉटेल मालकाकडे अन्न नमुने तपासणीच्या नावाखाली कारवाईची धमकी दिली. ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची बनावट ओळखपत्रे सुधा होते. पण त्यांच्या वागण्या बोलण्यावरून हॉटेल मालकाला संशय आला आणि त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. बनावट अधिकारी असल्याच्या संशयावरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक

तुकाराम मुंढे यांचे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला आदेश दिले आहेत कि ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच हॉटेलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना ही सुविधा असल्याचा बोर्ड समोर लावणे आवश्यक आहे. जर ग्राहकाने बाटलीबंद पाणी मागितले तरच ते देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नागरिकांना तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षेबाबत काही शंका असल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन FDA ने केले आहे. यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात.

Related Posts

UPI वापरावर शुल्क? ग्राहकांना काय सत्य आहे? जाणून घ्या सर्व काही

UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम. जाणून घ्या UPI शुल्काबाबतचे सत्य, लहान व्यापाऱ्यांवर काय परिणाम…

ByByrushikesh Aug 8, 2026

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य; ‘प्रशांत किशोरांची नेमणूक झाली नाही, आम्हाला रणनीतीकारांची गरज नाही’

प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रणनीतीकारांची गरज नसल्याचं सांगत…

ByByrushikesh Aug 8, 2026

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक : सरकारची पुन्हा एकदा संसदेत मांडण्याची तयारी, काँग्रेसचा स्पष्ट विरोध

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याची केंद्र सरकारची तयारी. दोन तृतीयांश बहुमतासाठी जोरदार हालचाली. काँग्रेसने थेट नकार देत…

ByByrushikesh Aug 8, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top