मराठवड्यात सध्या पावसाचा खंड पडला आहे. सगळीकडे कपाशी उगवून आली असून त्यावर आता मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. लक्षणे दिसताच लगेच उपाय योजना कराव्यात.
काय आहे मूळकुझ ?
पावसाळ्यात अचानक पावसाचा खंड पडला तर वातावरण अचानक उष्ण आणि कोरडे होते. त्या मुळे बुर्शी वेगाने वाढते. यामुळे कपाशीचे मुळे कुजू लागतात.
मूळकुझचे लक्षण काय आहेत?
वाशीच्या रोपाचा जमिनीलगतचा बुंधा कुजल्यामुळे, रोपे शेंड्याकडून कोमेजू लागतात आणि खाली झुकतात. कपाशीच्या बुंध्याजवळ बुरशीमुळे पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते. त्या ठिकाणी मोहरीच्या दाण्यासारखे तपकिरी बुरशीचे कण तयार होतात. या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांच्या काळात दिसतो. या बुरशीच्या संसर्गामुळे पानांवर करपा रोगासारखे डागही दिसू शकतात.
यावर उपाय काय?
तुमच्या शेतात कपाशीवर असे लक्षणं दिसताच, ते रोप उठवून शेताबाहेर नेऊन नष्ट करावे. तसेच, ज्या ज्या झाडावर याचे लक्षण दिसत आहेत, त्याच्या बुंध्याजवळ ट्रायकोडर्मा पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.















