८१ कंपन्यांविरोधात एफआयआर
कर्जमाफीबरोबरच राज्य सरकारने बोगस बियाणे प्रकरणीही मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून ११ हजार ५८४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ८१ कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विदर्भातील सर्वाधिक तक्रारी
खरीप २०२५ मध्ये सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर सर्वाधिक तक्रारी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून आल्या आहेत. एकूण ११,५८४ तक्रारींपैकी ८,१९२ प्रकरणांची तपासणी करण्यात आली असून, ७६३ नमुने अमान्य आढळले आहेत. या अमान्य नमुन्यांच्या आधारे ८१ कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.















