• Home
  • Agriculture
  • महाराष्ट्र पावसाची तूट : राज्यात १२.६% पाऊस कमी, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
Image

महाराष्ट्र पावसाची तूट : राज्यात १२.६% पाऊस कमी, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

महाराष्ट्रात मान्सून हंगामात १२.६% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले आहेत. वाचा सविस्तर…

महाराष्ट्र पावसाची तूट : राज्यात १२.६% पाऊस कमी, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

मान्सूनला उशीर झाल्याने आणि पावसाचे वितरण असमान झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा १२.६% कमी पाऊस झाला आहे. कोकणात चांगला पाऊस झाला असला तरी, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राज्यात मान्सून दाखल होऊन दीड महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, अपेक्षित पावसाऐवजी अनेक भागांत कमी आणि असमान पाऊस झाला आहे. महारेन पोर्टलवरील अधिकृत आकडेवारीनुसार, जूनपासून आतापर्यंत राज्यात सरासरी ४२१.१ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ ३६७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात १२.६ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली असून, आतापर्यंत सरासरीच्या केवळ ८७.४ टक्केच पाऊस झाला आहे.

कोकणात समाधानकारक पाऊस, मात्र विदर्भ-मराठवाड्यात मोठी तूट

राज्यात पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिले आहे. एका बाजूला कोकणात मुसळधार पावसामुळे नद्या आणि धरणे भरू लागली आहेत, तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठी ओढ दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागात २७.५ टक्के, तर नाशिक विभागात ३५.४ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. या भागांमध्ये विहिरी, कूपनलिका आणि लघु सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. तर गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ४६ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर आहे. जिल्ह्यात १३ जुलैपर्यंत २८४ मिलिमीटर पाऊस व्हायला हवा होता, पण आतापर्यंत फक्त ८४ मिलिमीटर पाऊस झाला आहे, म्हणजेच सुमारे ७१ टक्के पावसाची तूट आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा भागातही पाऊस कमी आहे.

सोयाबीन, कापूस, तूर पिकांवर मोठा परिणाम

पावसाच्या या तुटीचा सर्वाधिक फटका खरीप हंगामातील प्रमुख पिकांना बसला आहे. यंदा ऊस वगळता जवळपास सर्व प्रमुख खरीप पिकांची पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. देशात भात, कापूस, सोयाबीन, भुईमूग, तूर, मका आणि इतर तेलबिया पिकांचे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

मराठवाड्यात पेरणीचा वेग मंदावला आहे. काही शेतकऱ्यांनी तूर, उडीद, मूग आदींची पेरणी केली आहे, मात्र त्यावर पावसाची गरज आहे. कोरडवाहू मका, सोयाबीन आदींची पेरणी शेतकरी सध्या करीत नसल्याची स्थिती आहे.


दुबार पेरणीचे संकट, शेतकरी चिंतेत

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापूस पिकांची कोवळी रोपे करपू लागली आहेत.

प्रारंभी झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून बियाणे, खते व इतर कृषी साहित्य खरेदी करत पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे-खते, औषधांचा खर्च, मजुरीची टंचाई आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुबार पेरणी करावी लागल्यास त्यासाठी आवश्यक भांडवल कुठून उभे करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

पाणी पातळी घटली, चिंता वाढली

पावसाच्या तुटीमुळे राज्यातील जलस्रोतांची पाणी पातळीही घटली आहे. विहिरी, कूपनलिका आणि लघु सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. ठाणे जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची ७६ टक्के घट झाली आहे. बारवी धरणात केवळ २१.५९% पाणीसाठा शिल्लक असून संपूर्ण कोकणात पावसाची तूट आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या मान्सूनवर एल निनोच्या प्रभावासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल हवामान प्रणालींचा अभाव जाणवला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १० जुलै ते १५ जुलै दरम्यान महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे.

Related Posts

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर टोलेबाज हल्ला; कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी बावनकुळेंना नार्को टेस्टचे आव्हान

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र…

ByByrushikesh Aug 8, 2026

गोबरधन योजना 2026: शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखी संधी, शेणातून मिळवा अतिरिक्त उत्पन्न

केंद्र सरकारने २३,७३१ कोटी रुपयांची ‘गोबरधन’ राष्ट्रीय चक्राकार जैव-ऊर्जा योजना मंजूर केली. शेतकरी शेण विकून कमवू शकतात अतिरिक्त…

ByByrushikesh Aug 8, 2026

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; धरणे ओव्हरफ्लो, जायकवाडी ९५% भरले, हवामान विभागाचा काय अंदाज?

राज्यात सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने धरणांची पातळी वाढली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह मुंबई-पुण्याला दिलासा. जायकवाडी धरण ९५% भरले. आता…

ByByrushikesh Aug 7, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top